धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे- जिथे महाभारत यूद्ध घडले ते कुरुक्षेत्र . महाभारत महर्षि व्यासांकडुन प्रकट झाले. व्यास महर्षि केवळ कुरुक्षेत्र म्हणून थांबत नाहीत तर धर्मक्षेत्र असेही म्हणतात । का बरे ? युद्धाला भूमी लागते. ती आहे , कुरुक्षेत्र. पण खर्या अर्थाने धर्माची स्थापना होते कुठे ? कुरू क्षेत्रावर? वास्तविक धर्मक्षेत्र हे कुठे बाहेर नाही. ते तर प्रत्येकाच्या ठिकाणी असते. तिथेच तर धर्माची स्थापना होते. भगवंताने अवतार घेतला. जाहीर केले. "परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्क्रुताम धर्मसंस्थानार्थाय संभवामि युगे युगे. " ही स्थापना केवळ अन केवळ भक्ताच्या अंत:करणातच होत असते. अशी स्थापना कुणाच्या ठिकाणी झाली म्हणताना काही हाताच्या बोटावर मोजावीत अशाच व्यक्ति महाभारतात सापडतात. युद्धासाठी हाताशी घेतले भगवंतांनी पांडवाना. पण त्यांचे ठिकाणी धर्म स्थापना झाली का , मला तरी संभ्रम आहे. पांडव सतप्रवृत्त,पराक्रमी होते पण भक्तीचा अग्रक्रम होता का त्यांचे ठिकाणी. केवळ राधा, विदुर, सुदामा, मैत्रेय हृषी, उद्धव, रुक्मिणी सोडले तर अशी कुणाच्या ठिकाणी ही धर्म स्थापना झाली. परमभक्त भीष्माचार्य, हे आत्मज्ञानी होते अन कृष्णाच्या ध्यानात ते यथार्थाने रंगले होते. एकूण अठरा अक्षौहिणी सैन्य लढले त्यात अकरा अक्षौहिणी सैन्य कौरवांचे ते सोडले तर उरते सात अक्षौहिणी पांडवाचे. ते सर्व भक्त झाले का ? तेव्हा धर्मास्थापना केवळ भक्ताच्या ठिकाणीच होत असते. या भक्तीच्या ध्यासाने या हृदयात या सत्य धर्माची स्थापना व्हावी या प्ररणेने हा एपिसोड अवतरला आहे.