" संध्याछाया भिवविती हृदया " ही एका काव्यातील ओळ आहे. उतारवयात हा प्रश्न म्हणा, चिंता म्हणा बहुतेक सर्वांनाच असते. पुढे कधीतरी घडणार्या या प्रसंगाची आठवण नको म्हणत दूर जाण्याचा केविलवाणा प्रयत्न आतल्या आत सुरू होत असतो. त्यातून भय, चिंता, निराशा येत असते. असे हे मानसिक अस्तित्व जणू प्रत्येकालाच प्रश्न विचारत असते " तू तयार आहेस का ? " ( आर यू रेडी ?). आता ही तयारी कोणती ? ज्याची पराकोटीच्या भक्तीने प्रत्यक्ष भगवंताशी यारी जुळलेली आहे त्याची तयारी आधीच झालेली असते. म्हणून भक्त या प्रश्नाने डळमळीत नाही होत. नाही ढेपाळत. उलट तो भक्तीच्या कैफात गातो. "काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ." संताचे हे वास्तव आहे. पण माझे काय ?आर यू रेडी ? हाच प्रश्न वीस एक वर्षापूर्वी माझ्या सद्गुरूंनी निरुपणातून मला विचारला ? त्यांनी त्यांच्या अनुभवाचे उत्तरही देवून ठेवले " यस, एव्हर रेडी " अन मी जागा झालो , अगदी प्राणपणाने अनेक वर्षे प्रत्येक रात्री,हर घडीला मी मला हेच विचारत आलो. या त्यांच्या उदगाराती , एक एक अक्षर मला ऊर्जा देते झाले. मी आहे हे खरे आहे पण "मी" नाही हे सत्य आहे या भानातून आत्यंतिक भक्तीचा उद्भव त्यांच्या कृपेने घडला. सद्गुरूंच्या मुखातील एक वचन, एक वाक्य तेच काय एक अक्षर देखील देहाच्या नश्वरतेचे भान देत अविनाशी ईश्वराशी एकरूप करून ठेवू शकते हेच या देवाचे , या भक्तीचे माहात्म्य. असेच काहीसे प्रकट झाले आहे " R U Ready ? " या एपिसोड मधून.